“पुण्यात घरांच्या विक्रीत 7% वाढ; तीन वर्षांच्या घसरणीनंतर रिअल इस्टेट बाजारात सुधारणा मात्र, नवीन प्रकल्पांचा वाढता पुरवठा आणि मागणीतील तफावत यामुळे न विकलेल्या घरांचा साठा विक्रमी ₹92,110 कोटींवर पोहोचला आहे.
11 ऑगस्टला पुण्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत तिरंगा रॅली होणार असून FC रोडसह काही प्रमुख मार्गांवर दुपारी 2 वाजल्यापासून वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन आधीच करावे.
झारखंडमध्ये JPSC परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप उफाळला असून, विधानसभेकडे काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांशी झटापट झाली.
पोलिसांनी अश्रुधुराचा मारा, पाण्याच्या तोफांचा वापर आणि लाठीचार्ज केला; दरम्यान सरकारने तीन परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे.
महाराष्ट्रासह केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला असून, कामगिरीच्या आधारे काही मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर राज्यातील संभाव्य विस्तार आणि खातेवाटपाबाबत चर्चांना आणखी उधाण आले आहे.
बारामती एअरस्ट्रीपजवळ रविवारी एका खासगी कंपनीच्या प्रशिक्षण विमानाचे क्रॅश-लँडिंग झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, जानेवारीत याच परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 13 मे रोजीही बारामतीजवळ प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला होता, मात्र त्यातील प्रशिक्षणार्थी पायलट सुरक्षित बचावला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामती एअरस्ट्रीपवरील विमान सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
झारखंडमध्ये कथित पेपर लीक आणि परीक्षेतील अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून सरकारने विविध विद्यार्थी संघटनांशी चर्चा केली. मात्र, चर्चेत ठोस तोडगा निघाला नाही. आंदोलकांनी 14वी JPSC परीक्षा रद्द करण्यासह सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. NSUIने संशयित JPSC-JSSC परीक्षांची 90 दिवसांत CID चौकशी आणि NTAच्या धर्तीवर Jharkhand Testing Agency (JTA) स्थापन करण्याची मागणी केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासमोर मांडण्याचं आश्वासन दिलं आहे.
पुण्यातील कोथरूडमधील ६२ वर्षीय महिलेची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडीओचा वापर करून ८ लाख ९ हजार १०६ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. फेसबुकवर बनावट गुंतवणूक व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेने आपली वैयक्तिक माहिती शेअर केली. त्यानंतर सायबर ठगांनी तिला टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडून शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून महिलेने विविध बँक खाती आणि UPI आयडीवर पैसे पाठवले. २४ मे २०२६पर्यंत तिने एकूण ८.०९ लाख रुपये ट्रान्सफर केले.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधिमंडळातील फूट ही राजकीय फूट मानता येत नाही, तसेच शिंदे गटाला खरी शिवसेना घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हता, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने अपात्रतेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील रस्त्यांची दुरवस्था गंभीर बनली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका आणि वाहतूक कोंडी वाढली आहे. पावसामुळे खड्डे पाण्याखाली जात असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ते दुरुस्ती व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. महिलांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसने बिनशर्त जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. राजकीय मतभेद असले तरी महिलांचा सन्मान राखला पाहिजे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, काँग्रेस आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील (BMC) सत्ताधाऱ्यांकडून नवीन महागड्या गाड्यांच्या खरेदीसाठी चाललेली पैशांची उधळपट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रोखली गेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर, भाजपच्या सभागृह नेत्यांना अखेर हा वादग्रस्त प्रस्ताव मागे घ्यावा लागला आहे. यामुळे पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनावर मोठी नामुष्की ओढवली आहे.